rashifal-2026

बेजबाबदार वर्तन करणार्‍या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का?

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (10:18 IST)
राज्यात मुठभर लोक कायदा व सुव्यवस्था बिघडवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अतार्किक असून खरंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांकडूनच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो व संजय तटकरे उपस्थित होते.
 
सरकारमधील एक मंत्री खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देतात तर दुसरे मंत्री जाहीर सभेत शिव्या देतात. तसेच नाशिकमध्ये बिघडलेल्या परिस्थितीलाही तेथील पालकमंत्री गिरीष महाजनच जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार काय? असे आव्हान मलिक यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिले.
 
तसेच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेचे भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम हे समर्थन करत असल्याबद्दल मलिक यांनी त्यांच्यावर यावेळी कडाडून टीका केली.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Lionel Messi special visit to Vantara लिओनेल मेस्सीची वनताराला विशेष भेट, एक संस्मरणीय वन्यजीव अनुभव

बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी अचानक राजीनामा दिला

LIVE: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अपार्टमेंट घोटाळ्यात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली

पंजाबमध्ये धुक्यामुळे भीषण रस्ता अपघात, बर्नाला येथे बीएसएफ जवानासह ३ जणांचा मृत्यू

भयानक: शेतकऱ्याला विकायला लावली किडनी; रोहित पवार यांनी महायुतीवर तीव्र हल्ला चढवला

पुढील लेख
Show comments