Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘लस महोत्सव नक्की करू पण…’ आधी लस तर द्या- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

Webdunia
शनिवार, 10 एप्रिल 2021 (08:28 IST)
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी 11 ते 14 एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘आम्ही महोत्सव करू. आधी लस तर द्या असे पाटील म्हणाले.
 
राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर जयंत पाटील यांनी टोला लगावला. ते म्हणाले, ‘लस महोत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही महोत्सव करू. पण आधी तर लस द्या. लस पुरवठा करणे शक्य नसेल, तर लस महोत्सवाची वेळ बदला. तसेच लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र, केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी दिसत आहे, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्राची कोरोना लसींची मागणी सुमारे 40 ते 50 लाख होती. मात्र, केंद्राकडून फक्त साडेसतरा लाख लसींचा पुरवठा करण्यात आला. या लसी लगेच संपतील. पंतप्रधान मोदी यांनी जे जे सांगितले ते ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही तेही केले. त्यावर टीका केली नाही. मात्र, आता देशात कोरोना लसीचा पुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख