Festival Posters

मायलेज 10 टक्के वाढेल, या 6 सोप्या ट्रिक्स अमलात आणा

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (15:33 IST)
आपली कार कमी मायलेज देत असेल आणि याची तुम्हाला काळजी वाटत असेल तर आज आम्ही आपल्याला सांगत आहोत अशा सहा सोप्या ट्रिक्स ज्याच्या मदतीने आपण आपल्या वाहनांचे मायलेज 10 टक्कयांपर्यंत वाढवू शकता.
 
ब्रेक 
सतत ब्रेक लावणे किंवा पाय ब्रेकवर असणे किंवा कमी अंतरासाठी जोरात अॅक्सलरेट करणे अशा सवयींमुळे इंधन जास्त लागतं. वेग वाढवून ब्रेक लावत राहिल्यामुळे मायलेज कमी येतं.
 
स्पीड 
स्पीडने वाहन चालवण्यची सवय असल्यास त्याचा थेट परिणाम इंजिनच्या ताकदीवर होतो. आणि याचा परिणाम मायलेजवर पडतो. गाडी 50 ते 60 या किमी प्रति वेगाने चालवावी. या वेगाने गाडी चालवल्याने मायलेज चांगलं मिळतं.
 
टायर प्रेशर 
वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी असल्यास मायलेज कमी होतं. बरेच दिवस टायरमध्ये हवा न भरणे योग्य नाही. थोड्या थोड्या दिवसांनी टायरची हवा तपासून घ्यावी.
 
नायट्रोजन
अधिक मायलेज हवं असल्यास टायरमध्ये नायट्रोजन भरावी. टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असल्यास 30 टक्के अधिक मायलेज नियंत्रणात ठेवता येते.
 
एअर फिल्टर
कारचा एअर फिल्टर खराब झाला असल्यास थेट परिणाम इंजिनावर पडतो. याने इंधन वेगाने जळायला सुरु होतो आणि मायलेज घटते. फिल्टर तपासत राहावे कारण यात धूळ-मातीचे कण अडकून राहतात.
 
सर्व्हिसिंग
वाहनांची सर्व्हिसिंग वेळेवर केल्यास मायलेजवर परिणाम दिसून येतो. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यास कारचे पार्ट आणि इंजिन चांगल्याप्रकारे काम करतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पेट्रोल-डिझेलला पर्याय तयार! Tata Motors ची पहिली Flex Fuel कार भारतात लवकरच

केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले: ₹१,२३५ च्या दराला 'जखमेवर मीठ चोळण्यासारखे' म्हटले; आंदोलनाचा इशारा

LIVE: केंद्राच्या कांदा खरेदी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापले

कोल्हापुरात हृदयद्रावक घटना; अडीच वर्षांपूर्वी ज्या घाटात पत्नी-मुलांना गमावले, त्याच ठिकाणी पुण्याच्या व्यक्तीने संपवले जीवन!

६५० गुण मिळण्याची अपेक्षा होती': NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चार वर्षांपासून करत होता परीक्षेची तयारी

पुढील लेख
Show comments