Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप महागाईवर का बोलत नाही?

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (11:49 IST)
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न केला आहे की भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या निवडणूक भाषणात महागाईबद्दल का बोलत नाहीत? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब आणि तरुणांच्या कल्याणासाठी 24 तास काम केल्याच्या भाजपच्या दाव्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की हा दावा खरा असल्यास गेल्या 5 वर्षांपासून विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असलेल्या 11 लाख नोकऱ्या भरण्यात सरकार अपयशी का ठरले?

त्यांनी एका निवेदनात म्हटले की दररोज मतदारांना संबोधित करणारे ज्येष्ठ नेते जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबद्दल बोलत नाही. अखिलेश म्हणाले की भाजपने लोकांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचा दावा केला पण त्यांचे नेते सांगत नाहीत की जेव्हा गरिबांना सिलिंडर दिले जायचे तेव्हा त्यांची रिफिलची किंमत 400 रुपये होती आणि आज एका सिलिंडर रिफिलची किंमत 1000 रुपये इतकी आहे.
 
बलिया येथे सभेेेला  संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, भारतातील प्रत्येक क्रांतीमध्ये जिल्ह्याने कशी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तसेच गुरुवारी सहाव्या टप्प्यातील मतदानात मतदारांच्या मते भाजपला फटका बसू शकतो असे ही ते म्हणाले. खोटी आश्वासने देण्यात, लोकांना स्वप्ने दाखवण्यात आणि खोटे बोलण्यात भाजप महारत असल्याचे अखिलेश म्हणाले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments