Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिपळूणजवळचं तिवरे धरण फुटलं, 2 ठार 22 जण बेपत्ता

Webdunia
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटलं आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
 
या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या दोन जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.
 
तर 22 जण बेपत्ता आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
 
या घटनेनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या सात गावांमध्ये पूर आला आहे.
 
दरम्यान दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
 
पोलीस, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी बचावकार्य तातडीनं हाती घेतलं आहे.

संबंधित माहिती

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

Maharashtra Board Class 12th Result 2024 बारावीचा निकाल जाहीर

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

पुढील लेख
Show comments