Dharma Sangrah

काजोल-अजय येणार परत रुपेरी पडद्यावर?

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:40 IST)
बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पुन्हा एकदा मोठया पडद्यावर आणणार असल्याचे सांगितले आहे. अनीज बज्मी यांनी अजय-काजोल यांच्यासोबत “प्यार तो होना ही था’मध्ये एकत्रितपणे काम केले होते. त्यावेळी दोन्ही कलाकारांसोबत काम करण्याचा चांगला अनुभव होता, असे सांगत बज्मी म्हणाले एका चांगल्या स्क्रिप्टमधून या जोडीला पुन्हा एकत्रित आणणार आहे.
 
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले अनीस बज्मी सध्या त्यांच्या आगामी “पागलपंती’चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, इलियाना डिक्रूज, अरशद वारसी, पुलकित सम्राट, कृति खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्‍ला काम करित आहेत.
 
दरम्यान, अजय देवगण आणि काजोल यांच्या नवीन प्रॉजेक्‍टबाबत सांगायचे झाल्यास हे दोघेजण पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणा-या “तानाजी द अनसंग वॉरियर’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि भूषण कुमार करत आहे. अजय आणि काजोल यांनी 1999मध्ये लग्न केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

आर. माधवन यांनी एका बनावट जाहिरातीविरोधात आवाज उठवला; ''सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले..."

अमिताभ बच्चन यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीमागील सत्य समोर आले

धुरंधर २' ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर परदेशात हिट ठरला

वृंदावनची ५ सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे, या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

पुढील लेख
Show comments