Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४ दिवसात १५ हजार रुग्ण कोरोनामुक्त

४ दिवसात १५ हजार रुग्ण कोरोनामुक्त
Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2020 (08:50 IST)
राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. दरम्यान, कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १५ हजार २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात  २०४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवारांचा पक्षराज्य स्थापना दिनी निमित्त महाराष्ट्र महोत्सव' साजरा करणार

अजित पवारांचा पक्षराज्य स्थापना दिनी निमित्त महाराष्ट्र महोत्सव' साजरा करणार सुनील तटकरे यांची माहिती

न्यायाधीशांच्या घरातून सापडलेल्या रोख रकमेवरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा

अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची आणि त्याच्या मुलीची हत्या,जनरल स्टोअरमध्ये गोळ्या झाडल्या

तरुण आणि तरुणीचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्या केल्याचा संशय

पुढील लेख
Show comments