suvichar

पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (09:46 IST)
कोरोना विषाणूबाधित पाच रुग्ण आढळल्यानंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. पुण्यातील अनेक शाळाही पुढील काही दिवस बंद राहणार आहेत, तर खबरदारीसाठी खाजगी रुग्णालयातील शंभर बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. 
 
पुण्यातील विविध खाजगी रुग्णालयातील तब्बल शंभर बेड्स ताब्यात घेण्यात आले आहेत. रुबी हॉस्पिटलसह 18 खाजगी रुग्णालयांचे बेड्स जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. गरज पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल 11 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
 
कात्रज, सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर बिश्नोई टोळीकडून भाजप नेत्याला धमकी

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; जीर्ण भिंत कोसळून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतून राजीनामा दिला, त्यांचा २३ वर्षांचा प्रवास उलगडला

धुळे जिल्ह्यात लग्न समारंभात रक्तरंजित हाणामारी, तीन जणांचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचांचा मृत्यू तर अनेक खेळाडू जखमी

पुढील लेख
Show comments