Festival Posters

एअर इंडियाचे पाच पायलट करोनाच्या जाळ्यात

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (12:27 IST)
‘वंदे भारत मिशन' अंतर्गत अनेक परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना देशात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या मोहिेला मोठा धक्का  बसला. एअर इंडियाचे पाच पायलट करोनाग्रस्त आढळले आहेत. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडियाच्या विमानांद्वारे परदेशी भारतीय देशात दाखल होत आहेत. याशिवाय, लॉकडाऊन दरम्यान देशातील वेगवेगळ्या भागांत अत्यावश्यक  सामान आणि औषधं पोहचवण्याचं काम एअर इंडियावर सोपवण्यात आलं. एअर इंडियाचे पायलटही करोनाच्या जाळ्यात अलगद अडकल्यानं चिंता व्यकत केली जाते. उड्डाण भरण्यापूर्वी 72 तास अगोदर झालेल्या करोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले.
 
हे सर्व पायलट मुंबईत आहेत आणि पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेट करण्यात आलं. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पायलट कार्गो विमान घेऊन काही दिवसांपूर्वी चीनला गेले होते. उल्लेखनीय म्हणजे, 'वंदे भारत मिशन' अंतर्गत गेल्या 24 तासांत 800 हून अधिक भारतीय मादेशात परतलेत. परदेशांत अडकलेल्या प्रवाशांना घेऊन 12 देशांमधून विमानं देशात दाखल होत आहेत. देशातील14 शहरांमध्ये 64 फ्लाईटस्‌ उतरणार आहेत. ही विमानं छोट्या- छोट्या विमानतळांवरदेखील उतरतील.
 
लोक आपापल्या घराजवळ पोहचतील, यासाठी ही काळजी घेण्यात येते. 'वंदे भारत मिशन' दरम्यान आखाती देशांतून 27 उड्डाणं, संयुक्त अरब अमिरातमधून 11, बांग्लादेशमधून 7, दक्षिण पूर्व आशियातून 14, अमेरिकेतून 7 उड्डाणं तसंच लंडनमधून 7 उड्डाणं घेत विमानं भारतासाठी रवाना होत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

गोरखपूरच्या बरगदवा येथे एका भाजप नेत्याची हत्या

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवार पक्ष उमेदवार उभा करणार नाही सुप्रिया सुळे यांची घोषणा

१० हजार गावांमध्ये हवामान अनुकूल शेती योजना सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा

LIVE: १० हजार गावांमध्ये हवामान अनुकूल शेती योजना सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा

आयपीएल २०२६ साठी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये वैभव सूर्यवंशी सामील

पुढील लेख
Show comments