Marathi Biodata Maker

राज्यात गेल्या 24 तासात 42,320 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

Webdunia
मंगळवार, 25 मे 2021 (08:03 IST)
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारीही 30 हजारांच्या खाली राहिली. मंगळवारी राज्यात 22 हजार 122 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्णांच्या तुनलेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील रुग्णांची संख्या कमी होत असताना मृतांचा आकडा पाचशेच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
 
गेल्या 24 तसात 42 हजार 320 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 51 लाख 82 हजार 592 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) वाढले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 02 हजार 019 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.9 टक्के इतके आहे.
 
राज्यात 361 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.59 टक्के आहे. राज्यत आजपर्यंत 89 हजार 212 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 3 लाख 27 हजार 058 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 02 हजार 019 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

GDB संशोधन: भारतातील ३०% पेक्षा जास्त महिलांना बालपणातील लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

बिबट्याचा धुमाकूळ, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

दिवाळी सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सामील

पुढील लेख
Show comments