rashifal-2026

भारताच्या शेजारच्या या '३' देशांत कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू नाही

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:44 IST)
कोरोना विषाणूमुळे भारतात मृतांचा आकडा एक हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र भारता शेजारचे तीन  देश असे आहेत जिथे कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
 
भारताचे 3 शेजारी देश असलेले नेपाळ, भूतान आणि मालदीव हे जगातील अशा काही देशांमध्ये आहेत जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये कोरोनाची 250 प्रकरणे समोर आली आहेत. परंतु एकाचा ही येथे मृत्यू झालेला नाही.
 
नेपाळमध्येही कोरोनाचे 54 रुग्ण आढळले आहेत. परंतु अद्याप येथे कोणाच्या ही मृत्यूची माहिती समोर आलेली नाही. भूतानमध्ये कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहेत. 
 
बांगलादेशात कोरोनाचे 7,103 रुग्ण आढळले आहेत ज्यात 163 मरण पावले आहेत. सार्क देशांपैकी सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तान (327) आणि बांगलादेश (163) यांचा क्रमांक आहे. अफगाणिस्तानात, 1,828 लोकांना कोरोना झाला असून 58 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. श्रीलंकेत कोरोनाचे 622 रुग्ण आढळले असून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

National Safety Day2026: राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि आपली जबाबदारी

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

६०० हून अधिक भारतीयांना घेऊन दोन विशेष विमाने दिल्लीत दाखल, ऑपरेशन सुरू

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

पुढील लेख
Show comments