Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड केला वसूल

Webdunia
मंगळवार, 12 मे 2020 (16:27 IST)
राज्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळा. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अनेकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ हजार ८३८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ५६ हजार ४७३ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments