Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

Webdunia
शनिवार, 4 एप्रिल 2020 (12:33 IST)
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.
 
कोरोनामुळे सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीरकेली आहे. मात्र ही सुट्टी जाहीर होण्यापूर्वी कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवी परीक्षा सुरु होत्या. तर पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
 
कोरोनामुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहे. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्या? यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागवण्यात आल्या होत्या. यात विद्यापीठाला 100 पेक्षा जास्त सूचना आणि उपाय विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. यांची छाननी करुन नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाणार आहे. लॉकडाऊनंतर या सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाऊननंतर परीक्षेला सामोरी जावे लागणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments