Festival Posters

शनिप्रदोष म्हणजे काय ? पौराणिक कथा जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (07:46 IST)
शनि प्रदोष व्रत भगवान शिव, माता पार्वती आणि शनिदेवाची पूजा करण्यासाठीचा दिवस आहे. असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव स्वयं शिवलिंगात प्रकट होतात आणि यावेळी भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. शनि प्रदोष व्रत केल्याने शनिशी संबंधित अशुभ दूर होतात आणि शनिदेव शांत राहतात. शास्त्रानुसार शनि प्रदोष व्रत केल्यास व्यक्तीला दीर्घायुष्यासह सुख समृद्धी प्राप्त होते. याशिवाय कुंडलीत शनीच्या शुभतेसोबतच चंद्रही लाभ देतो.
 
या दिवशी कोणीही शनिदेवाची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून केल्यास त्याचे सर्व संकट आणि कष्ट नक्कीच दूर होतात आणि शनिदेवाचा प्रकोप, शनि साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभावही कमी होतो. 
शनि प्रदोष व्रतात प्रदोष काळात आरती आणि पूजा केली जाते. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो आणि रात्र येते तेव्हा त्या आक्रमणाला प्रदोष काल म्हणतात.
 
साधारण प्रदोष व्रत पूजा संध्याकाळी 4.30 ते 7.00 या दरम्यान केली जाते. या दिवशी 'ॐ नम: शिवाय' मंत्राचा जप करत महादेवाला जल अर्पित करावे आणि 'ॐ शं शनैश्चराय नम:' मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले गेले आहे.
 
शनि प्रदोष व्रत कथा : शनि प्रदोष व्रताच्या पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी एक मोठा व्यापारी होता. त्याच्या घरात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा होत्या, पण मुले नसल्यामुळे पती-पत्नी नेहमी दुःखी असायचे. 
 
बराच विचारमंथन केल्यावर व्यापार्‍याने आपले काम सेवकांकडे सोपवले आणि स्वतः पत्नीसह तीर्थयात्रेला निघाला. जेव्हा ते आपल्या शहरातून बाहेर आले तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसलेला एक साधू दृष्टीस पडला. व्यापार्‍याने विचार केला, ऋषींचे आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास का करू नये.
 
दोघे साधूजवळ बसले. जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की पती-पत्नी बराच वेळ आशीर्वादाची वाट पाहत बसले होते. त्यांना बघून साधू म्हणाले की मला तुमचे दु:ख माहित आहे. तुम्ही शनि प्रदोष व्रत करा, यामुळे तुम्हाला संततीचे सुख मिळेल.
 
साधुने दोघांना प्रदोष व्रत विधी सांगितली आणि महादेवाची वंदना देखील सांगितली- 
हे नीलकंठ सुर नमस्कार। शशि मौलि चन्द्र सुख नमस्कार।।
हे उमाकांत सुधि नमस्कार। उग्रत्व रूप मन नमस्कार।।
ईशान ईश प्रभु नमस्कार। विश्‍वेश्वर प्रभु शिव नमस्कार।।
 
दोघे साधुचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रेसाठी पुढे निघून गेले. तीर्थयात्रेहून परतल्यानंतर पती-पत्नीने शनि प्रदोष व्रत केले ज्याच्या प्रभावाने त्यांच्या घरी एक सुंदर पुत्राचा जन्म झाला.
 
महत्त्व : द्वादशी, त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर त्याने प्रदोष व्रत केले पाहिजे. या व्रताचे पालन केल्याने शिव प्रसन्न होऊन भक्ताला सर्व सांसारिक सुख व पुत्रप्राप्तीचे वरदान प्रदान करतात. म्हणून या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि शनीचा प्रकोप तसेच साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव कमी होतो.
 
प्रदोष व्रतात संध्याकाळी प्रदोष कालात आरती आणि पूजा केली जाते, या वेळेला प्रदोष काल म्हणतात. यासोबतच या दिवशी शनिदेवाची पूजा करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

तुम्ही पहिल्यांदाच खाटू श्यामला जात आहात? मग हे ५ नियम तुम्हाला माहित हवेत

Holashtak 2026: होळाष्टक दरम्यान काय करू नये?

Holashtak Daan 2026: होलाष्टकाच्या दिवसांत या आठ गोष्टींचे दान करा, पैशाची कमतरता दूर होऊ शकते

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments