Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dhulandi 2021 | धूलिवंदन सण साजरा करण्यामागील कारण

Webdunia
रविवार, 28 मार्च 2021 (08:50 IST)
होलिका दहन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी धूलिवंदन सण साजरा केला जातो. धुलेंडी हा सण धुलंडी, धुळवड, धुरड्डी, धुरखेळ, किंवा चैत बदी अशा अनेक नावांनी ओळखला जातो. धूलिवंदन साजरा करण्‍यामागील कारण नक्की काय ते जाणून घ्या-
 
1. त्रैतायुगाच्या प्रारंभमध्ये विष्णूंने धूलि वंदन केले होते. याच आठवणीत धुलेंडी साजरी केली जाते. धूल वंदन अर्थात यात लोक एकमेकांना धूल लावतात.
 
2. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी लोक एकमेकांवर चिखल, धूळ फेकतात. पूर्वी धूल स्नान करत होते. तेव्हा चिकण माती किंवा मुलतानी माती शरीरावर लावण्याची परंपरा 
 
होती.
 
3. पूर्वी धुलेंडीच्या दिवशी टेसूच्या फुलांचा रंग आणि गुलाल एकमेकांवर टाकत होते. धूलिवंदनला त्या लोकांच्या घरावर रंग टाकण्याची परंपरा देखील असते ज्यांच्या कुटुंबात 
 
एखाद्या सदस्याचा मृत्यू झाले असेल. काही जागी या दिवशी वर्षभरात गमी झालेल्या लोकांच्या घरी जाण्याची परंपरा देखील आहे. त्यांच्या कुटुंबाच्या लोकांवर प्रतिकात्मक 
 
रुपाने रंग टाकून काही वेळ बसण्याची परंपरा अजून देखील आहे. 
 
4. पूर्वी होलिका दहन केल्यानंतर धूलिवंदनाच्या दिवशी प्रहलादाचे प्राण वाचले या आनंदात लोक एकमेकांना गळाभेट देत होते, मिठाई वाटत होते. आजही होळी मिलन 
 
करण्याची परंपरा कायम आहे पण प्रहलादाची आठवण कमीच लोक काढतात.
 
5. आता धुलंडीला पाण्यात रंग मिसळून होळी खेळली जाते. परंतू धुलंडीला कोरडा रंग तर रंगपंचमीला पाण्याची होळी खेळण्याची परंपरा आहे. तसेच महाराष्ट्रात होलिका 
 
दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस धुळवड ते रंगपंचमी साजरी केली जाते. रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो. 
 
अनेक ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग व थंडाई पिण्याची प्रथा आहे. तर नैवेद्यात पुरणपोळी, कटाची आमटी, गुजिया, इतर पदार्थ करण्याची परंपरा आहे.

संबंधित माहिती

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

पुढील लेख
Show comments