Dharma Sangrah

शिवाजींनी समर्थ रामदास यांना अर्पण केले राज-वैभव

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (13:00 IST)
एकदा छत्रपती शिवाजींचे गुरुदेव समर्थ रामदास गुरु भिक्षेसाठी जात असे. तेवढ्यात त्यांना शिवाजींचे दर्शन झाल्यास शिवाजींनी गुरूस अभिवादन केले आणि म्हणाले "गुरुदेव मी आज पासून माझे सर्व राज-वैभव आपल्याला अर्पण करतो. गुरुदेव यावर उत्तरले "राजे आपण हे परत मागणार तर नाही"? राजे म्हणाले अजिबात नाही, हे संपूर्ण राज्य आपलेच आहे गुरुदेव.
 
तेव्हा समर्थांनी आपल्या वस्त्रातून फाडून एक तुकडा राजेंच्या मुकुटावर बांधला आणि म्हणाले "की मग आज पासून मी माझे राज्य आपल्या स्वाधीन करतो. आपण ह्या राज्यांचा सांभाळ करून याची काळजी घेऊन याचा व्यवस्थित सांभाळ करावा. राजेंचे डोळे हे बघून पाणावले. आपण माझी भेट मलाच परत करीत आहात. असे ते गुरूंना म्हणाले.
 
गुरूंनी त्यांना उत्तर दिले की राजे मला या राज्याला धर्म राज्य करावयाचे आहे. आपण याचा सांभाळ करावा आणि माझे वारस म्हणून राज्य करा. मी सदैव आपल्याबरोबर आहे. हे एकून राजे म्हणाले "मग ठीक आहे गुरुदेव मी आपणास वचन देतो की या राज्यांचा ध्वज नेहमी भगवा असेल." नेहमी आनंदी राहा !! असे म्हणून रामदास भिक्षेसाठी निघून गेले.
 
तात्पर्य : शिवाजी महाराजांचे आपल्या गुरूस राज्य समर्पित करणे आणि गुरूने ते परत देणे. एकमेकांवरची श्रद्धा आणि प्रेमाचे द्योतक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

पुढील लेख
Show comments