Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुराचं पाणी बोगद्यात शिरलं आणि 13 जणांचा मृत्यू झाला, अनेक गाड्या अडकल्या

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2023 (21:03 IST)
दक्षिण कोरियात पुरामुळे एक बोगदा पाण्यानं भरला आहे. बोगद्यात अनेक प्रवासी अडकले आहेत. या बोगद्यातून बचाव पथकातील कर्मचार्‍यांनी आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढले आहेत.
 
शनिवारी (15 जुलै) रात्री चिओंगजू नावाच्या शहरातील नदी दुथडी भरुन वाहिल्यानं बोगदा पाण्यानं भरला होता. पुरामुळे 683 मीटर लांबीच्या बोगद्यात अनेक वाहनं अडकली होती.
 
यातील बहुतांश लोक कारमध्ये होते. याशिवाय बोगद्यात एक बसही अडकली होती.
 
एकूण किती लोक अडकले आहेत, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियामध्ये गेल्या आठवड्यात पाऊस आणि पुरामुळे 39 जणांना जीव गमवावा लागला आहे.
 
पुरामुळे दक्षिण कोरियात अनेकदा भूस्खलन झालं असून वीज सेवाही विस्कळीत झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत 9 जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
बोगद्यात अडकलेले लोक
हा बोगदा चिओंगजू शहरातील ओसोंग भागात आहे.
 
बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेले सर्व मृतदेह बसमधून प्रवास करत होते. याशिवाय 9 जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं आहे.
 
अधिकाऱ्यांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर या लोकांना वाचवण्यात यश आलं असतं, असं पीडित कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
 
दक्षिण कोरियाच्या स्थानिक माध्यमांनी नदीला पूर येऊ शकतो, असा इशारा देणाऱ्या बातम्या दिल्या होत्या.
 
या इशाऱ्यानंतर बोगद्यात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कायदेशीर उपाय अवलंबता आले असते.
 
पाऊस आणि विद्ध्वंस
दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक मृत्यू ग्योंगसांगच्या डोंगराळ भागात झाले आहेत. या भागात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक घरं वाहून गेली आहेत.
 
देशातील पूरग्रस्त भागांची हवाई छायाचित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. आकाशातून घरांचे छत फक्त दिसत आहे.
 
सरकारी यंत्रणेनं हजारो लोकांची सुटका केली आहे. शनिवारी गेओसाम धरणातून पाणी वाहू लागलं. धरणाच्या खाली राहणाऱ्या 6,400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.
 
असं असतानाही अनेक ठिकाणांहून लोक बाहेर पडू शकले नाहीत आणि ते अजूनही घरातच अडकून पडले आहेत.
 
गेल्या शुक्रवारी चुंगचियोंग इथं भूस्खलनामुळे एक रेल्वे रुळावरून घसरली. सुदैवानं त्या रेल्वेमध्ये एकही प्रवासी नव्हता.
 
कोरियातील ट्रेन रनिंग एजन्सी कोरेलनं म्हटलंय की, ते सध्या सर्व धीम्या गतीच्या रेल्वे थांबवत आहेत.
 
येत्या बुधवारपर्यंत आणखी पावसाचा अंदाज कोरियाच्या हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामानामुळे देशासमोरील धोका कायम असल्याचं विभागानं म्हटलं आहे.
 
मुसळधार पावसामुळे भारत, चीन आणि जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
 
यामागे हवामान बदल हे प्रमुख कारण असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments