Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Indonesia Earthquake: जकार्तामध्ये 5.6 तीव्रतेचा भूकंप, 20 ठार, 300 हून अधिक जखमी

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (14:36 IST)
इंडोनेशियातील जकार्ता येथे 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यादरम्यान 20 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचवेळी 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सियांजूरच्या प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन यांनी सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. इमारतींमध्ये अडकल्यामुळे बहुतेकांना फ्रॅक्चर झाले आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो.
 
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये 10 किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. 
 
याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 होती.


Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Mahatma Gandhi Punyatithi 2025: मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय खेळांमधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सक्षम, हेल्पलाइन सुरू केली

पुढील लेख
Show comments