rashifal-2026

भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र अर्धवट - अजित पवार यांची टीका

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (08:34 IST)
महाआघाडीचा जाहीरनामा हा सर्व समाजघटकांचा विचार करून बनवलेला आहे. भाजपाचा जाहीरनामा हा अर्धवट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते निगडी येथे आले होते.
 
पुढे बोलताना पवार म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी यांचा उल्लेख नाही. सरकारच्या याच निर्णयांमुळे देशवासियांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी  आता विकासाबाबत बोलत नाहीत, त्यांनी यावेळी प्रचारासाठी भलतेच वैयक्तिक मुद्दे शोधले आहेत. त्यामुळे आता परिवर्तन करणे गरजेचे आहे. आपल्याला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, म्हणून गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. अजित पवार आणि आजोबा शरद पवार हे पार्थ पवार यांच्या निवडणुकीत जास्त रस घेत असून त्यामुळे ही जागा एक आवाहन बनले आहे. राष्ट्रवादी तर्फे पार्थ यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

भारतातील पहिल्या डिजिटल जनगणनेबाबत एक मोठी घोषणा, पहिला टप्पा १ एप्रिलपासून सुरू होणार

थंडीच्या लाटेमुळे नऊ राज्यांना धोका, बाहेर पडणे महाग पडेल; आयएमडीचा इशारा

WPL 2026 च्या उद्घाटन समारंभात हनी सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस सादरीकरण करणार

काँग्रेस आणि एआयएमआयएमसोबत भाजपची युती काही तासांतच तुटली; भाजपने लाजिरवाण्या वक्तव्यानंतर आमदारांना नोटीस पाठवली

भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

पुढील लेख
Show comments