Festival Posters

विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन, युतीकडे राष्ट्रवादाचा मुद्दा – देवेद्र फडणवीस

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2019 (08:37 IST)
गेल्या 30 वर्षांपासून आमची युती आहे. ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है  असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेना आणि भाजपला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा धागा बांधून ठेवते तर आम्ही युती केली तेव्हा शिवसेना-भाजपा दोघे मिळून एकत्र कार्यकर्ता मेळावा घेणार आहोत हे ठरले होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र भाजप-शिवसेनेचा संयुक्त मनोमिलन मेळाव्यात आपले मत व्यक्त केले.
 
युती झाली आणि युतीच्या हुंकाराने विरोधक पुरते गांगरले आहेत. कार्यकर्त्याचा मेळावे झाल्यावर महायुतीची 24 तारखेला पहिली सभा होणार आहे. आमची युती 30 वर्षांपासून असून, ‘ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है’असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकायच्याच असा निर्धार कार्यकर्त्यांना समोर व्यक्त केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने व राज्यातील युती  सरकारने जनसामान्यांसाठी मोठी  कामे केली आहेत सोबतच अनेक योजना राबल्या असून यामध्ये हागणदारी मुक्त योजना, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान योजनेचाही उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन
 
देशात 22 पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आणि सर्व बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र हात वर करून ‘हम साथ साथ है’च्या घोषणा देखील  केल्य. मात्र त्या जागेवरून बाहेर पडताच सपा-बसपाने काँग्रेसला म्हटले ‘हम आपके है कौन’आणि काँग्रेसने दिल्लीमध्ये आपला म्हटलं ‘हम आपके कौन है’.आता हे सार्व एकमेकांना कसे पराभूत करता येईल यासाठी काम सुरु केले आहे. या सर्व एकत्र आलेल्या विरोधकांचे महागठबंधन नाही तर महाठगबंधन असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. आमची युती नसून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी लढण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

रेल्वेच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध रहा; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

LIVE: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या कॉपीबाबत फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली

बालभारती पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध महाराष्ट्र सरकार मोहीम सुरू करणार

अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा करण्यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली

महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या नक्कल विरोधात फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली, १०७ केंद्रांची मान्यता रद्द केली

पुढील लेख
Show comments