Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाकाहारी लोकांना Corona संसर्ग, जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणतात

Webdunia
शुक्रवार, 15 मे 2020 (15:38 IST)
आरोग्य विषयक तज्ज्ञ आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष प्रोफेसर के. श्रीनाथ रेड्डी यांचे म्हणणे आहे या दाव्याचे काही पुरावे नाही की शाकाहारी लोकांना कोविड विषाणूंचा संसर्ग होऊ शकत नाही. ते म्हणाले की शाकाहारी लोकांना देखील कोविड 19 संसर्गाची लागण झालेली आहे.
 
एम्स मधील हृदयविकार विभागाचे माजी प्रमुख म्हणाले की हे मात्र खरं आहे की आपल्या दैनंदिनीच्या आहारात फळे आणि भाज्यांचा प्रामुख्याने समावेश करणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असते. ते या संसर्गाशी चांगल्या प्रकारे लढू शकतात.
 
ते म्हणाले की शाकाहारी असो वा मांसाहारी लोकांनी आपल्या आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा प्रामुख्याने समावेश करावा. जेणे करून कुठल्याही संसर्गाशी लढण्यासाठी त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. 
 
अनेक मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन अभ्यासात सहभागी असलेले डॉ रेड्डी म्हणाले की तोंड, नाक याच बरोबर आपले डोळे पण झाकणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, हे विषाणू मुख्यतः चेहरा, नाक, तोंड किंवा डोळ्यांच्या माध्यमांतून शरीरात शिरतो. आपणं अनेकदा डोळ्यांना झाकणे विसरतो. 
 
रेड्डी म्हणाले, संक्रमित व्यक्तीच्या बोलण्याने किंवा शिंकल्याने त्याच्याकडून येणारे थेंब दुसऱ्याचा चेहऱ्यावर पडतात. तेव्हा ते थेंब डोळ्यांतून सुद्धा शरीरात जाऊ शकतात. कारण डोळे आणि नाक जुळलेले आहेत.
 
ते म्हणाले, आपण चष्मा घातलेला असल्यास योग्य ठरेल. या व्यतिरिक्त लोकं प्लास्टिकने पूर्ण चेहरा झाकण्याचा देखील सल्ला देत आहेत ज्याने आपल्या डोळ्यात काही ही पडता कामा नये.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख