Dharma Sangrah

मुलगा झाला नापास, वडिलांनी वाटली मिठाई

Webdunia
मंगळवार, 15 मे 2018 (15:29 IST)

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एका वडिलांनी आपला मुलगा दहावीत नापास झाला म्हणून सगळ्या परिसराला पार्टी दिली आहे.  व्यवसायाने ठेकेदार असणाऱ्या सुरेंद्र कुमार व्यास यांनी त्यांचा मुलगा दहावीत नापास झाला म्हणून त्यांच्या परिसरात सर्वत्र मिठाई वाटली. त्यांच्या घराशेजारी एक शामियाना तयार करण्यात आला आणि तिथे मिठाई वाटण्यात आली. फटाकेही फोडण्यात आले. व्यास यांचा मुलगा बोर्डात नापास झाला म्हणून त्यांनी ही मिठाई वाटत असल्याचं समजल्यानंतर मात्र त्यांचे शेजारी आश्चर्यचकित झाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलं परीक्षेत नापास होतात आणि निराशेच्या भरात टोकाचं पाऊल उचलतात. परीक्षा ही कितीही महत्त्वाची असली तरी जीव जास्त महत्त्वाचा आहे. बोर्डाची परीक्षा ही काही अंतिम परीक्षा नाही. अशा संधी वारंवार येणार. तेव्हा मुलाने एका अपयशाने खचून जाऊ नये म्हणून ही पार्टी दिल्याचं व्यास यांचं म्हणणं आहे. माझा मुलगा पुन्हा परीक्षा देणार आहे, असंही ते पुढे म्हणाले. व्यास यांचा मुलगा आशु यानेही आपल्या वडिलांचं कौतुक केलं असून अधिक जोमाने अभ्यास करून पुढच्या वर्षी पास होण्याचं वचनही त्याने वडिलांना दिलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments