Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलगा झाला नापास, वडिलांनी वाटली मिठाई

Webdunia
मंगळवार, 15 मे 2018 (15:29 IST)

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एका वडिलांनी आपला मुलगा दहावीत नापास झाला म्हणून सगळ्या परिसराला पार्टी दिली आहे.  व्यवसायाने ठेकेदार असणाऱ्या सुरेंद्र कुमार व्यास यांनी त्यांचा मुलगा दहावीत नापास झाला म्हणून त्यांच्या परिसरात सर्वत्र मिठाई वाटली. त्यांच्या घराशेजारी एक शामियाना तयार करण्यात आला आणि तिथे मिठाई वाटण्यात आली. फटाकेही फोडण्यात आले. व्यास यांचा मुलगा बोर्डात नापास झाला म्हणून त्यांनी ही मिठाई वाटत असल्याचं समजल्यानंतर मात्र त्यांचे शेजारी आश्चर्यचकित झाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलं परीक्षेत नापास होतात आणि निराशेच्या भरात टोकाचं पाऊल उचलतात. परीक्षा ही कितीही महत्त्वाची असली तरी जीव जास्त महत्त्वाचा आहे. बोर्डाची परीक्षा ही काही अंतिम परीक्षा नाही. अशा संधी वारंवार येणार. तेव्हा मुलाने एका अपयशाने खचून जाऊ नये म्हणून ही पार्टी दिल्याचं व्यास यांचं म्हणणं आहे. माझा मुलगा पुन्हा परीक्षा देणार आहे, असंही ते पुढे म्हणाले. व्यास यांचा मुलगा आशु यानेही आपल्या वडिलांचं कौतुक केलं असून अधिक जोमाने अभ्यास करून पुढच्या वर्षी पास होण्याचं वचनही त्याने वडिलांना दिलं आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments