rashifal-2026

वडिलांच्या मारेकर्‍यांना माफ केले: राहुल गांधी

Webdunia
'वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसला होता. आम्ही खपू तणावात होतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नसल्याने मी आणि प्रियांकाने वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 
 
सिंगापूर येथे आयआयएममध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा उपद्रवी लोक तुमच्या विरोधात जातात. त्यामुळे तुमचा मृत्यू अटळ असतो. वडील आणि आजीने घेतलेल्या भूमिकांमुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, याची आमच्या कुटुंबाला कल्पना होती, असं राहुल यांनी सांगितलं. 
 
वडील मृत्यूला सामोरे जात आहेत. हे आम्हाला माहित होतं. आमची आजी इंदिरा गांधीही मृत्यूला सामोरे जात आहेत, हे सुद्धा आम्हाला माहित होतं, असं सांगतानाच मी मरणाला सामोरे जात आहे, असं इंदिरा गांधी यांनी घरात सांगितलं होतं. वडिलांनीही तेच सांगितलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राहुल यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

ईशा महाशिवरात्री सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

होळीनिमित्त पुण्याहून दानापूर, गोरखपूर, नागपूरसाठी विशेष गाड्या चालवणार

धाराशिवमध्ये काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हिंसक हाणामारी, सहा जण जखमी

LIVE: पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

महाराष्ट्रात 20 ठिकाणी एटीएसचे छापे

पुढील लेख
Show comments