Marathi Biodata Maker

वडिलांच्या मारेकर्‍यांना माफ केले: राहुल गांधी

Webdunia
'वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसला होता. आम्ही खपू तणावात होतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नसल्याने मी आणि प्रियांकाने वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 
 
सिंगापूर येथे आयआयएममध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा उपद्रवी लोक तुमच्या विरोधात जातात. त्यामुळे तुमचा मृत्यू अटळ असतो. वडील आणि आजीने घेतलेल्या भूमिकांमुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, याची आमच्या कुटुंबाला कल्पना होती, असं राहुल यांनी सांगितलं. 
 
वडील मृत्यूला सामोरे जात आहेत. हे आम्हाला माहित होतं. आमची आजी इंदिरा गांधीही मृत्यूला सामोरे जात आहेत, हे सुद्धा आम्हाला माहित होतं, असं सांगतानाच मी मरणाला सामोरे जात आहे, असं इंदिरा गांधी यांनी घरात सांगितलं होतं. वडिलांनीही तेच सांगितलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राहुल यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments