suvichar

चक्क व्हाट्सअपवर आरोपपत्र, सर्वोच्च न्यायालयाकडून फटकार

Webdunia
सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (08:44 IST)
झारखंडच्या एका स्थानिक न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव आणि त्यांच्या पत्नी निर्मलादेवी यांच्याविरोधातील गुन्हेगारी खटल्याचे कामकाज सुरु ठेवताना आरोपपत्र चक्क व्हाट्सअपवर टाकण्याचे अजब आदेश दिले. या प्रकरणात झारखंडचे माजी मंत्री साव आणि त्यांची पत्नी जामिनाच्या अटींचे सतत उल्लंघन करीत आहेत. दोघेही सतत भोपाळच्या बाहेरच राहतात. त्यामुळे या दोघांवरही खटल्याची सुनावणी करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दोघांवर व्हाट्सअॅपने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश हजारीबागच्या स्थानिक सत्र न्यायाधीशांनी दिले आहेत. यावर झारखंडमध्ये काय चालले आहे आणि जमिनीवरील आरोपी सुनावणीसाठी येत नाहीत ,याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. आरोपींची अटींचा भंग केला असेल तर त्यांचा जामीन रद्द करा, त्यासाठी व्हाटसअॅपवर आरोपपत्र कसले दाखल करता, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आणि भलतीच कृती करून न्यायसंस्थेची बदनामी करू नका, असा सज्जड दम स्थानिक सत्र न्यायालय आणि झारखंड सरकारला भरला.
 
माजी मंत्री साव आणि त्यांच्या पत्नीवर २०१६ मध्ये झारखंडच्या बारका गावातील गावकऱ्यांना राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून (एनटीपीसी) स्थलांतरित करण्याविरोधात आंदोलन छेडून दंगल भडकावल्याचे आरोप आहेत. २०१६ मध्ये झारखंडमध्ये पोलीस आणि गावकरी यांच्यात घडलेल्या हिंसक झटापटीत ४ जणांचा बळी गेला होता. याप्रकरणात  साव आणि त्यांच्या पत्नीला गेल्यावर्षी सशर्त जामीन देण्यात आला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नम्रपणे आणि मराठीत बोलून विश्वास जिंका; चालकांनी आता प्रवाशांना 'ताई-मावशी' आणि 'भाऊ-काका' म्हणावे; परिवहन विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी

फलोदीच्या नव्या अंदाजात ममता बॅनर्जींचे सरकार पिछाडीवर: दुसऱ्या टप्प्यातील मतदानोत्तर अंदाज का बदलला?

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन केले

महाराष्ट्र दिनानिमित्त एक मोठी भेट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले

नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा कहर; कोंबड्या मारण्याचे आदेश तर कुक्कुटपालन उद्योगात घबराट

पुढील लेख
Show comments