Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जहाज तब्बल चारशे वर्षांनी सापडले

Webdunia
शनिवार, 29 सप्टेंबर 2018 (00:53 IST)
पोर्तुगालच्या सागरी किनारपट्टीवर एका विवक्षित जहाजाच्या शोधामध्ये असलेल्या पुरातत्त्व वेत्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या तज्ञांना लिस्बनच्या किनारपट्टीच्या नजीक चारशे वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. या जहाजावरून भारतातून पोर्तुगाल येथे निर्यात करण्यात आलेले मसाले होते. या पुरातत्त्व वेत्त्यांच्या टीमच्या प्रमुखांच्या नुसार, हा शोध या शतकातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक म्हणता येऊ शकेल. पोर्तुगालच्या दृष्टीनेदेखील हा अत्यधिक महत्त्वाचा शोध असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या जहाजाच्या अवशेषांच्या आसपासच्या परिसरामध्ये मसाल्यांचे अवशेषही पुरातत्त्व वेत्त्यांना सापडले आहेत. या अवशेषांच्या जोडीने नऊ तोफाही सापडल्या असून त्यांवर पोर्तुगीजांचे राजचिन्ह अंकित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच चिनी मातीची भांडी आणि तत्कालीन चलनात असलेली नाणीही सापडली आहेत. ही नाणी खास गुलामांच्या खरेदी विक्रीकरिता वापरली जात असल्याचे तज्ञ म्हणतात. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या जहाजाचे आणि त्यावरून नेण्यात येत असलेल्या वस्तूंचे अवशेष लिस्बनच्या किनारपट्टीजवळ सापडले होते. पण या जहाजाला जलसमाधी मिळून इतकी वर्षे लोटल्यानंतरही अवशेष पुष्कळ चांगल्या स्थितीमध्ये असल्याबद्दल तज्ञांनी समाधान व्यक्त केले. हे जहाज 1575 ते 1625 या काळादरम्यान बुडाले असावे असा अंदाज असून, त्या काळादरम्यान भारतातून पोर्तुगालमध्ये मसाल्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जात असे. याच परिसरामध्ये 1994 साली आणखी एका पोर्तुगीज जहाजाचे अवशेष आढळले होते. या ठिकाणी अनेक जहाजांना जलसमाधी मिळाली असल्याचे तज्ञ सांगतात. मसाले वाहून नेणारे हे जहाज शोधण्यासाठी या तज्ञांना काही वर्षे अथक प्रयत्न करावे लागले, त्यांच्या या प्रयत्नांना पोर्तुगीज सरकारचे साहाय्यही लाभले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली

चिप्स, कोल्ड्रिंक्स, बिस्किटांबाबत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नवीन नियम जारी

पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होणार म्हणाले अमित शहा

मुंबई: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध महिलेची फसवणूक

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत २२ नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद

पुढील लेख
Show comments