rashifal-2026

‘ही’ वाहिनी लॉकडाउनच्या काळात ठरली ‘अव्वल’

Webdunia
शनिवार, 11 एप्रिल 2020 (06:53 IST)
लॉकडाउनच्या काळात लोकांना घरातच थांबवण्यासाठी ‘रामायण’सारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे पुन्हा प्रसारण करणे दूरदर्शनच्या चांगलेच पथ्यावर पडले असून ३ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात दूरदर्शन ही देशातील सर्वाधिक पाहिली गेलेली दूरचित्रवाणी वाहिनी ठरली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.
 
दूरदर्शनच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेतील प्रेक्षकसंख्या तब्बल ४० हजार टक्क्यांनी वाढली आहे. यामागे रामायण आणि महाभारत, या मालिकांचेच प्रामुख्याने योगदान आहे, असे ‘बीएआरसी’ने स्पष्ट केले. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात खासगी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाउन दरम्यान रामायणसह महाभारत, शक्तिमान आणि बुनियाद यांसारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे दूरदर्शनने पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यापैकी बहुतांश मालिकांची निर्मिती दूरदर्शननेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असताना केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments