Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 12 सप्टेंबरनंतर आचारसंहिता लागू होणार

Webdunia
बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (16:44 IST)
राज्यात विधानसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर म्हणजे 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. दोन टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे. 
 
या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते. 
 
2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 12 सप्टेंबरला गणेश विसर्जन झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या दुसर्‍याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. 2014 मध्ये गणेशोत्सवानंतरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments