Festival Posters

सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप - मराठा क्रांती मोर्चा

Webdunia
बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (08:43 IST)
मराठा आरक्षणासाठी ०९ ऑगस्टपासून व्यापक जन आंदोलन केले जाणार आहे. महिला, मुलं, पाळीव जनावरांसोबत प्रत्येक गावात आंदोलन उभारले जाईल. काही दिवसात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असे मराठा क्रांती मोर्चाच्या लातुरात पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
 
राहीचंद्र मंगल कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला २२ जिल्ह्यातील समन्वय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकूण नऊ ठराव घेण्यात आले. मराठा आंदोलनाला सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप या बैठकीत करण्यात आला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शासनाला यापूर्वीच मागण्यांचे निवेदन दिले आहे. आता कसलीही चर्चा करायची नाही आणि कुणाचीही मध्यस्थी नको आहे, ०१ ऑगस्टपासून त्या त्या जिल्ह्यामध्ये मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, मराठा आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये द्यावेत, या कुटुंबातील सदस्यास सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, काकासाहेब शिंदे आणि तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकार्‍यांची एसआयटी चौकशी करावी, केवळ मराठा आरक्षणासाठी विधीडळाचे अधिवेशन बोलवावे, आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकार सोबत असहकार आंदोलन केले जईल, राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची या नंतरची बैठक परभणी येथे आयोजित केली जाईल असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू

LIVE: भिवंडी महानगरपालिकेने १,१७९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

आरटीई कोट्यातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळांनी शैक्षणिक साहित्यासाठी पैसे घेऊ नये, राज्य सरकारचा इशारा

हरमनप्रीतची टी-२० क्रमवारीत सुधारणा, मंधानाने दुसरे स्थान कायम राखले

भिवंडी महानगरपालिकेने १,१७९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, करात कोणतीही वाढ नाही

पुढील लेख
Show comments