Marathi Biodata Maker

कांदा आवक वाढली, सरासरीच्या दरात घसरण

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (22:40 IST)
नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती पुढील आठवड्यात बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे सरासरी कांद्याच्या दरात ८०० ते ९०० रुपयांची घसरण झाली आहे.
 
काही दिवसांपासून कांद्याचे दर चांगल्या प्रकारे वाढले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने बाजार समितीत देखील आवक वाढली होती. मात्र यामुळे मागील पाच दिवसात कांद्याच्या दारात सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाली असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. 
 
दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात ८०० डॉलर प्रति टन दराने वाढ केली. तसेच नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजार २५ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने परिणाम झाला आहे.  
 
मागील पाच दिवसात कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने ८०० ते ९०० रुपयांची घसरण होत कांद्याची दर ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असून पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक  शेतकऱ्यांना ३५ ते ४० कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments