Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महागाईचा चटका, तूरडाळ 100 रुपये किलो

Webdunia
लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. धान्य, कडधान्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली असून तूरडाळीचा भाव प्रतिकिलो 100 रुपये झाल्याने ग्राहकांना महागाईचे चटके बसताय. 
 
मागील दोन महिन्यांत डाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मसूर, मूग आणि मटकी या कडधान्याबरोबर, शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रात दुष्काळ तर काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने धान्य आणि कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून 100 रुपये दर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीचा दर 64 रुपयांवरुन 100 रुपयांवर पोहोचला आहे. 
 
मसूरडाळ आणि मूगाच्या दरात चार रुपये प्रतिकिलो चार या दराने वाढ झाली आहे. तसेच शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
 
उल्लेखनीय आहे की 2015 मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होते आणि त्यावर्षी 220 रुपये प्रतिकिलो या दराने तूरडाळीची विक्री झाली. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments