Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs ENG : भारताने दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (15:03 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारतीय संघाने 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. अश्विन 500 कसोटी बळींपासून अजून एक विकेट दूर आहे.

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली. तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. 
 
भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

बांगलादेशविरुद्ध चेपॉकच्या मैदानात केएल राहुल नक्की येणार, कर्णधाराकडून हिरवा सिग्नल

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

IND vs BAN सिरीज पूर्वी गंभीर ने घेतली या खेळाडूची मदत

Duleep Trophy: प्रथमसिंग आणि टिळक वर्मा यांनी शतके झळकावली

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments