Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तात्या टोपे यांच्याबद्दल तुम्हाला या 7 खास गोष्टी माहित असाव्या

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (11:58 IST)
तात्या टोपे यांचा जन्म 1814 मध्ये येवला येथे झाला. तात्यांचे खरे नाव रामचंद्र पांडुरंग राव होते, पण लोक त्यांना प्रेमाने तात्या म्हणत. वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. त्यांचा जन्म देशस्थ कुलकर्णी कुटुंबात झाला.
 
त्यांचे वडील बाजीराव हे पेशव्यांच्या बंदोबस्त विभागाचे प्रमुख होते. त्यांची विद्वत्ता आणि कर्तव्यनिष्ठा पाहून बाजीरावांनी त्यांचा राज्यसभेत अनमोल नवरत्नांनी जडवलेली टोपी देऊन गौरव केला होता, तेव्हापासून त्यांचे टोपणनाव 'टोपे' असे पडले.
 
1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नायकांमध्ये तात्या टोपे यांचे उच्च स्थान आहे. त्यांचे जीवन अतुलनीय शौर्याने भरलेले आहे. तात्यांच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया-
 
* पेशवाई संपल्यानंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तिथे तात्यांनी पेशव्यांच्या राज्यसभेची जबाबदारी सांभाळली.
 
* 1857 च्या उठावाची वेळ जसजशी जवळ आली तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे मुख्य सल्लागार बनले.
 
* 1857 च्या उठावात तात्या एकट्याने इंग्रजांशी यशस्वीपणे लढले.
 
* 3 जून 1858 रोजी रावसाहेब पेशवे यांनी तात्यांना सेनापती पदावर नियुक्त केले. खचाखच भरलेल्या राज्यसभेत त्यांना रत्नजडित तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 
* 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर तात्याने गनिमीकाव्याची रणनीती स्वीकारली. गुना जिल्ह्यातील चंदेरी, इसागड तसेच शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी, कोलारस या जंगलात तात्या टोपे यांनी गनिमी कावा केल्याच्या अनेक दंतकथा आहेत.
 
* 7 एप्रिल 1859 रोजी तात्या शिवपुरी-गुणाच्या जंगलात झोपलेले असताना फसवणूक करून पकडले गेले. पुढे 15 एप्रिल 1859 रोजी तात्याला इंग्रजांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली.
 
* 18 एप्रिल 1859 रोजी सायंकाळी क्रांतिवीरांचे अमर हुतात्मा तात्या टोपे यांना ग्वाल्हेरजवळील शिपरी दुर्गाजवळ फाशी देण्यात आली. या दिवशी गळ्यात फास टाकून त्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले होते.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments