Marathi Biodata Maker

मुघलांनी धर्मांतरासाठी क्रूरतेची मर्यादा ओलांडली, पण प्रत्येक जखमेतून आवाज आली जय भवानी

Webdunia
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजेंनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोंकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच काही ग्रामीणांनी आपली समस्या राजेंसमोर मांडली, ज्यामुळे राजेंनी स्वत:जवळ केवळ 200 सैनिक घेऊन बाकी सेना रायगडला पाठवली. त्याचवेली गुपित रस्त्याने औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने 5000 सैन्यांसह संगमेश्वरावर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजेंना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले.
 
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. या दरम्यान औरंगजेबाने अमानवीयता आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जीभ कापणे या सारख्या शिक्षा फर्मावल्या. औरंगजेबाने संभाजीराजेंना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली.बहादुरगडावर एका बोडक्या घाणेरड्या उंटावर साखळदंडाने बांधून संभाजी महाराजांना व कवी कलशांना उलटे बसवून मिरवले गेले होते.
 
तरीही संभाजीराजेंनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी त्यांच्या बलिदानापूर्वी औरंगजेबाने म्हटले की माझ्या चारी मुलांमधून एक जरी तुझ्यासारखा असता तर पूर्ण मुघलांनी संपूर्ण हिंदुस्तानावर राज्य केलं असतं.
 
सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजेंनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद; विधान परिषदेच्या उपसभापतींची ठाम भूमिका, अधीक्षक यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

Virgin Boy Egg मुलांच्या लघवीत अंडी उकळून तयार कॉफी का पीत आहेत हे लोक? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हवामान विभागाने महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'हाय अलर्ट' दिला

मुंबई-गोवा महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा, वाहतुकीवर मोठा परिणाम

पुढील लेख
Show comments