Dharma Sangrah

औरंगजेब जेव्हा करतो संभाजीराजे यांचे कौतुक

Webdunia
संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. 
 
संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
 
संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. 
 
मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. 
 
त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. 
 
मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
 
मुघलांच्या कैदीत असताना औरंगजेब म्हणाला होता की जर एक देखील मुघल संभाजीराजांसारखा असता तर मुघलांनी पूर्ण जगावर राज केलं असतं.
 
औरंगजेबाने जेव्हा मराठ्यांवर हल्ला केला होता तेव्हा औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. 
 
मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. 
 
संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
 
संभाजी महाराज छत्रपती शिवाजींजे उत्तराधिकारी होते. आपल्या काळात मराठांचे प्रबळ शत्रू मुघल औरंगजेब बीजापूर आणि गोलकुण्डाचे शासन हिन्दुस्तानातून नाहीसे करण्यात त्यांची भूमिका मुख्य होती. 
 
आपल्या शौर्यासाठी प्रसिद्ध संभाजी राजे यांनी आपल्या शासनकाळात 120 युद्ध केले आणि एकाही युद्धात परास्त झाले नाही. संभाजी महाराजांचे पराक्रम एवढे होते की एकदा ओरंगजेबने शप्पथ घेतली होती की छत्रपती संभाजी धरले जात नाही तो पर्यंत ते मुकुट धारण करणार नाही.
 
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

योगी - मोदी टार्गेट करताय, शिंदे बनावट हिंदू असल्याचे भासवताय, संजय राऊत यांनी शंकराचार्य वादावर राजकीय बाण सोडला

२०३२ नंतर दिल्ली नव्हे तर नागपूर भारताची राजधानी असेल! सर्वात प्रबळ दावेदार का ?

मुंबईत पुन्हा एकदा महिला महापौर, भाजपच्या 'या' ३ धाकड महिलांची नावे शर्यतीत सर्वात पुढे!

Balasaheb Thackeray Jayanti 2026 बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

पुढील लेख
Show comments