Dharma Sangrah

रोज सकाळी केव्हा उठावे

Webdunia
बुधवार, 10 एप्रिल 2024 (05:30 IST)
What time should we wake up every morning: रात्री किती वाजता झोपावे. सकाळी किती वाजता उठावे हा प्रश्न नेहमी प्रत्येकाच्या मनात असतो. जेव्हा पासून विजेचा शोध लागला तेव्हापासून माणसांच्या झोपेची वेळ बदलून गेली. शहरातील लोकांचे झोपणे आणि जागणे पूर्णपणे बदलून गेले आहे. अनेक लोक रात्री उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात. काही लोक असे देखील आहे की रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. हे जाणून घ्यायला हवे की, सकाळी केव्हा उठावे आणि रात्री केव्हा झोपावे. 
 
सकाळी केव्हा उठायला हवे-
भारतातील धार्मिक परंपरेनुसार सर्वांनी ब्राह्ममुहूर्तावर उठायला हवे. सूर्यदयाच्या पूर्व प्रहरात दोन मुहूर्त असतात. त्यातील पहिल्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ब्रह्म मुहूर्तची वेळ सूर्योदयपासून 1 तास 36 मिनट पहिले सुरु होते आणि 48 मिनट पहिले समाप्त होते. स्थानीय वेळेनुसार सूर्योदयची वेळ वेगवेगळी असते. आपल्या घड्याळानुसार पहाटे 4.24 ते 5.12 ची वेळ ब्रह्ममुहूर्त आहे. अनेक लोकांची मान्यता आहे की, सकाळी 04 ते 5:30 मध्ये अंथरून सोडून द्यावे. काही शास्त्रज्ञाच्या मते, सकाळी 05:30 से 06 मध्ये उठणे चांगले असते. 
काही एक्सपर्ट मानतात की, सकाळी 06 ते 07 मध्ये उठणे चांगले असते. एक्सपर्ट यांच्या मतानुसार रात्री 10 वाजता झोपलेले चांगले असते. व्‍यस्‍त जीवनशैलीमध्ये रात्री 11 वाजता झोपणे आणि सकाळी 6 वाजता उठणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. 
 
का उठावे सकाळी लवकर- 
जर तुम्ही साधक असाल तर सकाळी लवकर उठायला हवे. कारण यावेळी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतो आणि वातावरण पण आध्यात्मिक असते. जर तुम्ही तुमच्या जीवनात काही लक्ष ठरवले असेल तर तुम्ही सकाळी उठले पाहिजे. ज्यामुळे दिवसभरातील काम करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल.
 
सकाळी लवकर उठण्याचे फायदे- 
वैज्ञानिक शोधानुसार ब्रह्ममुहुर्तमध्ये वायुमंडल प्रदूषणरहित असते. या वेळी वायुमंडलमध्ये ऑक्सीजन (प्राणवायु)चे प्रमाण सर्वात जास्त (41 प्रतिशत) असते. जो फुफुसांच्या शुद्धीसाठी चांगला असतो. शुद्ध वायु मिळाल्याने मन, मेंदू आरोग्यदायी राहतो. वैज्ञानिकांच्या मते, या वेळी ऑक्सीजन 41 प्रतिशत, कमीतकमी 55 प्रतिशत नाइट्रोजन आणि 4 प्रतिशत कार्बन डाईआक्साइड गॅस असते. सूर्योदय नंतर वायुमंडल मध्येऑक्सीजन कमी आणि कार्बन डाईआक्साइड वाढतो. आयुर्वेद अनुसार या वेळी जी हवा वातावरणात वाहते तिला अमृततुल्य संबोधले आहे. ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून फिरल्याने शरीरात संजीवनी शक्तिचा संचार होतो. ही वेळ अध्ययनसाठी देखील उत्तम सांगितली गेली आहे. कारण रात्री आराम झाल्यानंतर आपण जेव्हा सकाळी उठतो. शरीरात आणि मेंदूमध्ये ऊर्जा आणि ताजेपणा निर्माण झालेला असतो. सकाळी ऑक्सिजनचे प्रमाण देखील जास्त असते. ज्यामुळे केलेले अध्ययन लक्षात राहते.   

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नावावरून मुलींसाठी प्रेरणादायी नावे

World Health Day 2026 जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

उन्हाळा स्पेशल थंडगार चविष्ट कोकोनट मिल्क आईस्क्रीम

Biography of Mangal Pandey :क्रांतिकारक मंगल पांडे यांची माहिती

सैल त्वचेला घट्ट करतात ही जीवनसत्वे, आहारात आवर्जून समावेश करा

पुढील लेख
Show comments