Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा

Webdunia
गुरूवार, 6 जानेवारी 2022 (22:07 IST)
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण कधी-कधी नवरा -बायकोमधलं प्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं, कारण दोघांमध्ये पूर्वीसारखा उत्साह राहत नाही. हे बहुतेक पती-पत्नीमध्ये घडते, परंतु आम्ही  अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांना अवलंबवून आपण आपल्यातील नाते उत्साहाने भरू शकता आणि पूर्वीसारखे सुंदर बनवू शकता. 
लग्नाला जास्त दिवस झाल्यावर काही जोडपे  एकमेकांना आय लव्ह यू म्हणत नाहीत , पण आपण  जोडीदाराला आय लव्ह यू म्हणल्याने नात्यात एक नवीन उत्साह येतो. जोडीदाराकडून हा शब्द ऐकल्यानंतर लोकांना एक सुंदर अनुभूती मिळते. जर आपल्याला  असे वाटत असेल की आपल्या  जोडीदाराने आपल्यासाठी काही खास केले आहे, तर  त्याच्याकडे जा आणि त्याच्या कानात हळूवारपणे म्हणा - माझे तुझ्यावर प्रेम आहे. 
लग्नाला बराच काळ झाल्यानंतर लोक बायकोला सरप्राईज देणेही बंद करतात. काळाच्या ओघात नातं कंटाळवाणं होत जातं. नात्यात उत्साह आणण्यासाठी काहीतरी नवीन करण्याची गरज आहे. आपण जोडीदाराच्या आवडीचे खाण्यापिण्याचे पदार्थ बनवा आणि त्यांना सरप्राईज द्या. यामुळे नात्यात नवीन उत्साह येऊ शकतो. 
 
काही जण जोडीदाराला चित्रपट पाहायला घेऊन जातात, पण बहुतेकांना चित्रपट बघायला आवडत नाही. त्यामुळे त्यांना डिनर डेटवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. यासोबतच जोडीदारासोबत फिरायला जा. 
 
नातेसंबंधांमध्ये सुंदर भावना आणण्यासाठी लोकांनी जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवला पाहिजे, ज्यामुळे प्रेमात उत्साह टिकून राहतो. दिवसातून एकदा तुमच्या जोडीदारासोबत बसून जेवण नक्की करा. जोडीदारासोबत असताना मोबाईल कमी वापरावा. जोडीदाराशी मनामोकळेपणाने संभाषण करा. 
 
 जोडीदाराला आकर्षित करण्यासाठीआपण लुक देखील बदलू शकता. पण दिसायला फारसा फरक पडत नाही. आपण जोडीदाराचे कौतुक केले पाहिजे. आपण  जोडीदाराला मिठी मारून चांगल्या प्रेमाच्या गप्पा करा.
 
 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments