rashifal-2026

लग्नानंतर म्हणे अस्स होतं...

Webdunia
सोमवार, 5 जुलै 2021 (20:11 IST)
लग्नानंतर म्हणे अस्स होतं,
लग्नानंतर म्हणे तस्स होतं,
प्रत्येक जण काहीं न काही म्हणतो,
पण जो भोगतो तोच खरं जाणतो !
राखली जातात का खरंच मन एकमेकांची,
जपणूक होते का हो एक दुसऱ्याच्या भावनांची!
सतत सोबत राहिल्याने चेहेरे दिसू लागतात सारखे!
पण सोबत असले तरी, नसतात का परके!
लोकांना दिसावं म्हणून हसतात कित्ती तरी खोटं,
तुटू नये म्हणून तोलून धरतात खोपट,
असतात असें ही आपल्या अवती भवती,
ओळखायचं कसं, मुखवटे चढवतात न चेहेऱ्यावरती!
घुसमटतात, व्याकुळ होतात पण राहतात सोबत,
खऱ्या लग्नाची मात्र मोजावी लागते किंमत!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Parenting Tips:मुले त्यांच्या पालकांपासून दूर जाण्याचे मुख्य कारण जाणून घ्या

प्रेरणादायी कथा: उंट आणि झेब्राची गोष्ट

घरीच फक्त अर्ध्या तासात मऊ पनीर बनवण्याची स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

Housewarming Wishes in Marathi वास्तुशांतीच्या शुभेच्छा

भरपूर प्रथिने असेलेली सोपी चिकन टिक्की रेसिपी

पुढील लेख
Show comments