Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर म्हणे अस्स होतं...

marathi kavita
Webdunia
सोमवार, 5 जुलै 2021 (20:11 IST)
लग्नानंतर म्हणे अस्स होतं,
लग्नानंतर म्हणे तस्स होतं,
प्रत्येक जण काहीं न काही म्हणतो,
पण जो भोगतो तोच खरं जाणतो !
राखली जातात का खरंच मन एकमेकांची,
जपणूक होते का हो एक दुसऱ्याच्या भावनांची!
सतत सोबत राहिल्याने चेहेरे दिसू लागतात सारखे!
पण सोबत असले तरी, नसतात का परके!
लोकांना दिसावं म्हणून हसतात कित्ती तरी खोटं,
तुटू नये म्हणून तोलून धरतात खोपट,
असतात असें ही आपल्या अवती भवती,
ओळखायचं कसं, मुखवटे चढवतात न चेहेऱ्यावरती!
घुसमटतात, व्याकुळ होतात पण राहतात सोबत,
खऱ्या लग्नाची मात्र मोजावी लागते किंमत!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा

रामनवमी विशेष रेसिपी Apple Coconut Barfi

या ५ लोकांनी चुकूनही टरबूज खाऊ नये, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

टॅलीमध्ये करिअर करा

उन्हामुळे हात-पायांची चमक गेली असेल तर हे घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments