suvichar

Regular Periods Naturally मासिक पाळी उशीरा येत असल्यास या गोष्टींचे सेवन करा

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (11:42 IST)
मासिक पाळी उशिरा येण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. अनेकदा महिला यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबतात. पण तरीही विशेष परिणाम दिसून येत नाही. प्रत्येक समस्येवर योग्य आहार हे औषध आहे असे म्हणतात. हे मासिक पाळीशी संबंधित समस्यांवर देखील लागू होते. तज्ञांप्रमाणे जर तुम्ही तुमच्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
 
मासिक पाळी उशिरा का येते?
आजचे धावपळीचे जीवन आणि अस्वस्थ जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. ज्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. PCOD, अनियमित मासिक पाळी ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. याशिवाय ताणतणाव, अतिव्यायाम, गर्भनिरोधक गोळ्या घेणे आदींमुळेही मासिक पाळी उशिरा येते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर याचा अर्थ तुम्हाला वजन कमी करावे लागेल. स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल. यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घ्या.
 
हे मसाले वापरा
उशिरा मासिक पाळी येण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मसाल्यांचा समावेश करावा. यासाठी सकाळी एक चमचा हळद पाण्यासोबत घ्या. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे तुमची मासिक पाळी वेळेवर सुरू होईल. याशिवाय शतावरी देखील खूप फायदेशीर ठरेल. ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे, जी अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल. सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत जिरे खाणे.
 
आहारात बटाट्याचा समावेश करा
पीरियड्समध्ये बटाटे खाण्याचे फायदे याबद्दल सर्वात मोठा गैरसमज आहे की बटाटे खाल्ल्याने तुम्हाला चरबी मिळते. पण तसे अजिबात नाही. मासिक पाळी उशिरा येत अससल्यास बटाटे खावेत. तुम्ही त्याची भाजी बनवू शकता किंवा इतर मार्गांनी आहारात समाविष्ट करू शकता. पोटॅशियम बटाट्यामध्ये आढळते, जे मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते. पण फ्रेंच फ्राईज खाऊ नका.
 
शरीर डिटॉक्स करणे
शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. विशेषत: पीरियड्सच्या काळात, त्यामुळे या काळात तुम्ही ड्रिंक घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही, तुम्ही घरीही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा चमचा भाजलेले जिरे, अर्धा चमचा भाजलेल्या जवसाच्या बियांची पावडर, अर्धा चमचा पुदिना पावडर लागेल. या सर्व गोष्टी एका ग्लास पाण्यात मिसळा. हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ शकता. हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

जातक कथा : सोनेरी खार

वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही? रात्रीच्या जेवणात 'या' ५ लाइट रेसिपीजचा करा समावेश

वयाची ३० ओलांडली आहे? महिलांनी सुदृढ राहण्यासाठी या ४ महत्त्वाच्या टेस्ट कधीच टाळू नयेत

Red Flags तुमचे नाते 'टॉक्सिक' तर नाही ना? या ५ धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका

शिवजयंतीच्या निमित्ताने पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की करून पहा; जे महाराजांचे देखील प्रिय आहे

पुढील लेख
Show comments