Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम ; पाणी कपातीची पालिकेची घोषणा

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (07:35 IST)
भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
 
मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

२०१६ च्या हत्या प्रकरणात आरोपीला ठाणे जिल्ह्यातील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

ठाणे : अटकेपूर्वी जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल

Nagpur violence: हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू

आता नागपुरात बुलडोझर चालणार! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दंगलखोरांकडून नुकसान भरून घेणार

LIVE: नागपूर हिंसाचार संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली बैठक

पुढील लेख
Show comments