rashifal-2026

मध्य रेल्वे विस्कळीत; मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद झाली

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (08:00 IST)
ठाणे रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून कल्याणकडे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची वाहतूक ठप्प झाली. यामुळे कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रवाशांना सायंकाळी ६.३७ ते ७.३३ या एक तासांच्या कालावधीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर अडकून पडावे लागले. यामुळे अप व डाऊन मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये तासन् तास अडकून पडल्याने प्रवासी उकाड्याने अक्षरश: हैराण झाले.
 
ठाणे व कळवादरम्यान सिग्नल यंत्रणेत ६.३७ वाजता बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. ठाण्याकडे येणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकातच थांबविण्यात आल्यामुळे रेल्वेच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments