Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम ; पाणी कपातीची पालिकेची घोषणा

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (07:35 IST)
भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
 
मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबई आणि आसपासच्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आरबीआय कडून ग्राहकांना मोठा दिलासा ,रुपये काढण्याची परवानगी

गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडली,मृत्यू

फ्रान्समधील रशियन वाणिज्य दूतावासात स्फोट, मॉस्कोने म्हटले - दहशतवादी हल्ल्याचे संकेत

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला

पुढील लेख
Show comments