Marathi Biodata Maker

Mumbai Heavy Rain Alert : येत्या दोन ते तीन तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (12:20 IST)
Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी कोंडी झाली आहे. येत्या दोन ते तीन तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 
 
 देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी केला आहे. येत्या 24 तासांत पालघर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि गडचिरोली येथे मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
हवामान खात्याने इशारा दिला आहे 
 
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान संस्थेने 14 जुलैपर्यंत महाराष्ट्रात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. मुंबईत पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की 1 ते 10 जूनपर्यंत पुरामुळे मृतांची संख्या 83 वर पोहोचली आहे. राज्यात एनडीआरएफच्या 13 टीम आणि राज्य आपत्ती नियंत्रणाच्या दोन टीम वेगवेगळ्या भागात कार्यरत आहेत.
 
 
पुण्यात 2 ठिकाणी भूस्खलन तर गडचिरोलीत 3 जण बेपत्ता 
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे पुण्यातील खेड तालुक्यातील भीमाशंकर मंदिराजवळ एकापाठोपाठ दोन दरड कोसळल्या. पहिली भूस्खलन सकाळी झाली तर दुसरी घटना दुपारी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळी अधिवेशन शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामगिरीची यादी देत २०३५-२०४७ साठीचा रोडमॅप मांडला

स्मार्ट मीटर वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठा आदेश जारी केला

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

पुढील लेख
Show comments