Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेकडून सरकारला सविनय कायदेभंग करण्याचा इशारा

Webdunia
गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (16:23 IST)
बेस्ट बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का ? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. एक ट्विट करत त्यांनी राज्य सरकारला सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला आहे.
 
बेस्ट बसमध्ये रोजचा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असताना लोकल सेवा सुरू होत नसल्यानेच त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेत सरकारला जाब विचारला आहे. दररोज एसटी आणि बेस्ट बसेससाठी लागणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा यामुळे मुंबईत येणाऱ्या तसेच मुंबईतून उपनगर आणि नजीकच्या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांचे रोजचे हाल होत आहेत. बेस्ट बस एकीकडे खचाखच भरून धावत आहे. दुसरीकडे लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहेत. अशावेळी लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारला मनसेने अल्टीमेटम दिला आहे.
 
अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा लोकल ट्रेनमध्ये उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामध्येच बसची फ्रिक्वेन्सी पुरेशी नसल्याने बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. एसटीच्या फेऱ्यादेखील अतिशय तोकड्या आहेत. जर लोकल सेवा लवकर सुरू झाली नाही तर सविनय कायदेभंग करावा लागेल असा ईशारा मनसेकडून देण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments