Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईचा रिअल लाईफ सिंघम, सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले

मुंबईचा रिअल लाईफ सिंघम  सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले
Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (15:04 IST)
मुंबईत भरदिवसा भररस्त्यात तरुणीवर चाकू हल्लाचा प्रकार पाहायला मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवानं मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला आहे. ही घटना मुंबईतल्या वडाळा येथील बरकत अली नाका येथे घडली आहे. 
 
तरुणीच्या घरचे लग्न करण्यास परवानगी देत नसल्यामुळे संतापलेल्या तरुणाने गंभीर पाऊल उचललं आणि त्यानं रागाच्या भरात तरुणीला भररस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल. आरोपी तरुण धारदार चाकूने तरुणीवर सपासप वार करणार तेवढ्यात पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांनी त्या माथेफिरू तरुणाला वेळीच अटकाव केला आणि तरुणीचे प्राण वाचवले. मात्र यावेळी आरोपी तरुणाने केलेला एक वार पाटील यांच्या हातावर झाला आणि या हल्ल्यात ते जखमी झाले.
 
काही सेकंदांत घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी शिवडीच्या बरकत अली नाका येथे पायी जात असताना 31 वर्षीय अनिल बाबर हा तिच्या पाठीमागून आला आणि तरुणीला रस्ता क्रॉस करत असताना त्याने चाकूने तिच्या पाठीवर वार केला. त्यावेळी तेथे तैनात असलेले वडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर पाटील यांनी तात्काळ धाव घेत आरोपीला अनिलला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पाटील यांच्या हातावर सुद्धा वार केला. पण पोलिसांनी हिंमतीने आरोपीला रोखून तरुणीचे प्राण वाचवले.
 
आरोपी अनिलला पकडण्यात आले असून जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले गेले आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार बरकत अली नाका परिसरात घडला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी बजेटला निरुपयोगी म्हटले

LIVE: दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार! म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

'पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांचा पराभव नाही, तर त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे', फडणवीस विधानसभेत म्हणाले

दुर्गा पूजा पंडालमध्ये भीषण आग, १० वर्षांचा मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments