Marathi Biodata Maker

तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सात अंशांचा फरक

Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:04 IST)
मुंबईसह कोकणाकडे पावसाने पाठ फिरवल्याने शहराच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झालीय. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तोंड फिरवल्याने मुंबईचं तापमान ऑगस्टमध्येच वाढताना दिसत आहे.मागील तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सात अंशांचा फरक पडल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
 
होसाळीकर यांनी ट्विटरवरुन एक आलेख पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये सांताक्रुझ येथील हवामानखात्याच्या वेधशाळेत मुंबईतील तापमान वाढल्याची नोंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे.आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईतील तापमान ३३ अंशांवर पोहचल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील तापमान हे २६ अंशांपर्यंत होतं.मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने निरभ्र आकाश दिसून येत असून तापमानातही वाढ झाल्याचं होसाळीकर म्हणालेत. 
 
ऑगस्टच्या प्रारंभापासूनच मुंबई शहर,उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली.कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे. मुंबई उपनगरात काही दिवसांपूर्वी २६.५ अंश सेल्सिअस किमान, तर ३१.८अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.दोन्हींमध्ये सरासरीच्या तुलनेत २अंशांची वाढ दिसून आली.मुंबई शहर भागात आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमानात २ अंशांची वाढ काही दिवसांपूर्वीच झाली असून आता ही वाढ अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये लँडिंग दरम्यान बिझनेस जेट कोसळले; अनेकांचा मृत्यू

LIVE: दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल

दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठा बदल, आता अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल

महाराष्ट्रातील 24 नगर परिषदांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची प्रकृती बिघडली

पुढील लेख
Show comments