Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भुशी डॅम अपघातानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2024 (17:01 IST)
लोणावळ्या जवळील भुशी डॅमच्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याच्या अपघातानंतर आता पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. पर्यटकांना संभाव्य धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली असून सायंकाळी 6 नंतर पर्यटकांना धरणावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटनस्थळी गोताखोर,बचाव नौका आणि लाईफ जॅकेट ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 
भुशी डॅम जवळ धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेसह चार मुले वाहून गेली.नंतर त्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
 
या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना संभाव्य धोके ओळखून मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, वेल्हा, भोर,आंबेगाव भागात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्यास सांगितले आहे. या साठी पश्चिम घाटाचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.  

अधिकाऱ्यांना नद्या, धरणे,किल्ले, धबधबे या क्षेत्रात तसेच पर्यटनस्थळी चेतावणी देणारे फलक लावून प्रतिबंधित क्षेत्रांचे सीमांकन करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी आपत्ती प्रवण आहे त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले तसे न झाल्यास त्यांना तातडीनं बंद करावे. 
 
सध्या वर्षाविहार सहलीसाठी पर्यटक भुशी,पवना धरण परिसर,लोणावळा,सिंहगड,माळशेज घाट आणि ताम्हिणी घाट येथे भेट देतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन,रेल्वे ,महानगरपालिका सारख्या यंत्रणांना पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांसाठी गोताखोर,बचाव नौका,लाईफजॅकेट ठेवण्याचे निर्देश दिले आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments