Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

Burn the 12th question paper of Pune Board
Webdunia
बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (14:43 IST)
अहमदनगर : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्‍या आहेत. घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल दाखल होत टेम्पो विझवण्यात आला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता.
 
बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. 
 
पुणे बोर्डाला या घटनेची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जाणार आहे. त्यानंतर या नेमक्या कोणत्या प्रश्नपत्रिका होत्या, हे स्पष्ट होईल, असं पोलीसांनी सांगितलं आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग अटोक्यात आणली. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments