Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोलापूर महामार्गावर धावत्या बस ने पेट घेतला, सुदैवाने जीवित हानी नाही

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (13:28 IST)
सोलापूर महामार्गावर कदम वस्ती ग्राम पंचायत हद्दीत ग्रॅन्ड हॉटेलच्या समोर एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 
 
ही बस हैदराबादहून पुण्याच्या दिशेने जात असताना बसमध्ये एकूण 17 प्रवाशी प्रवास करत असताना कदम वस्ती ग्राम पंचायत बस आली असता बसचे टायर फुटून बसने पेट घेतला. या घटनेत सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसने पेट घेतला तेव्हा प्रवाशी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. 

वाहनचालकाला हे लक्षात आल्यावर त्याने बसमधील सर्व प्रवाशांना तातडीनं बसमधून आरडा ओरड करत खाली उतरायला सांगितले. पाहता पाहता क्षणातच संपूर्ण बस ने पेट घेतला. 
घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यावर त्यांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. वाहनचालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

सर्व पहा

नवीन

ठाण्यात गणपती मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यामुळे हाणामारी, 5 जखमी

राज्यात मुसळधार पावसाचा उद्रेक, 200 हून अधिक जणांची सुखरूप सुटका, पिकांचे नुकसान

देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात, मनोज जरांगेचा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप

पुरुषाने महिलेचा वेष धरून भरले 30 अर्ज, लाडकी बहीण योजनेत सरकारला लावला चुना, भिंग फुटले

दिशा सालियन प्रकरणी गौप्यस्फोट करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला

पुढील लेख
Show comments