rashifal-2026

Pune : अजितदादा-चंद्रकांत पाटीलांमध्ये शीतयुद्ध, काय आहे हे प्रकरण

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (16:45 IST)
Ajit Pawar vs Chandrakant Patil : सध्या अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात निधीवरून शीतयुद्ध झाल्याची चर्चा आहे. गेल्या 3 महिन्यांपासून 400 कोटी रुपयांच्या विकासकामाला निधी मिळत नसल्याची तक्रार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

सध्या विकासकामे प्रलंबित होत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार चंद्रकांत पाटील दादांना डावलत असल्याचे दिसत आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार यांची नियुक्ती होण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. मात्र भाजपचे काही नेते चंद्रकांत पाटील हेच या पदावर राहण्याची मागणी करत आहे. 

मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख  शरद पवार देखील होते.या वेळी 400 कोटी रुपयांच्या विकासकामासाठी मंजुरी दिली होती. 1 जुले रोजी या बैठकीचे इतिवृत्त मंजुरीसाठी जिल्हाप्रशासनाकडे पाठवले. 

2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर हे इतिवृत्त बराच काळापासून जिल्हा प्रशासनाकडे मंजुरी अभावी रखडल्याचे समोर आले आहे. ही कामे अजित पवारांची मंजुरी न मिळाल्यामुळे प्रलंबित असल्याची तक्रार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. पुण्यातील प्रलंबित विकास कामांना निधी मिळत नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटीलांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्रींनीं तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.   
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments