Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलीस भरतीसाठी मुलीला पुण्यात घेऊन आलेल्या पित्याचा दुर्दैवी अंत

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (08:44 IST)
पुणे :नाशिकहून मुलीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या पित्याचा रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सुरेश सखाराम गवळी (55, रा. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे.
 
सध्या पोलिस भरतीसाठी राज्यातील विविध भागातून तरूण-तरूणी त्यांच्या पालक आणि मित्रांसोबत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या ग्राऊंडवर मोठय़ा संख्येने येत आहेत. सोमवारी सकाळी पोलीस भरतीसाठी मुख्यालयाच्या ग्राऊंडवर मुलीला सोडून चहा पिण्यासाठी, रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने सुरेश गवळी यांचा जागीच मृत्यू झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकचे रहिवाशी असलेले सुरेश गवळी हे रिक्षाचालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि 22 वषीय मुलीला घेऊन ते रविवारी रात्री दहा वाजता पुण्यातील शिवाजीनगर भागात आले होते. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर फुटपाथवर कुटुंबियांसह रात्री काढली. सोमवारी भरतीसाठी त्यांच्या मुलीची ग्राऊंड परीक्षा होती. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला पोलीस ग्राऊंडच्या गेटवर सोडले आणि ते पत्नीला सांगून जवळच चहा पिण्यासाठी निघाले. तेथून काही अंतरावर पायी चालत गेल्यानंतर रस्ता ओलांडताना अनोळखी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळय़ात पडले. त्यांची पत्नी रेश्मा याकाही अंतरावर असल्याने त्यांनी अपघात झाल्याचे पाहिले आणि त्या तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. मात्र, गवळी यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments